
“प्रेम हे आंधळ असत”..
ज्याले मिळालं तो नशीबवान असतं…
जो टिकवून घेतो त्यातच खरा जिवन असत..
अशीच गाथा मित्रा आज तुझी आहे,
नशीबवान मात्र आज ती आहे…
खरी खंबिरता तिने आज मात्र दाखवली,
प्रेमाचा खरा रूप आज मात्र साकारली…
होतास मित्रा तू बेरोजगार,
तरी होता तुला तिचा आधार…
ती होती डुटी वाली, तरी तुझ्या प्रेमात पडून,
तू लागणार असा विश्वास तुला देत राहिली…
मेहनत तुझी लागली दयाला नशीब तुझे फुलवायला,
आज तुझ स्वप्न साकार झालं, तिची साथ घेवून विश्वास तिचा दिसून आला…
तिच्या समोर तू अधिकारी होवून आज आल,
पण तुमच्यात जाती पातीचा डोंगर मात्र आळ आल…
तिच्या घरच्यांच्या नकारांन मन मात्र नाराज झालं,
पण सयमता मात्र तुझ्यात होती,
विश्वासाची गाठ मात्र तुम्हा दोघात होती.
पण ती खंबीर पने उभी राहली, आपल्या वचनाला कायम राहिली..
आज मात्र घरच्यांना मनवून घेतलं, खरा साथीदार हाच आहे हे मात्र पटवून घेतलं…
तुमचा खरा संघर्ष आज दिसून आल्, तुम्हाला खऱ्या बंधनात आज पाडून गेलं…
प्रेम खर काय असते तून दाखवून दिलं ताई,
दिखावा नाही तर,मनापासून निभवल ताई…
खरंच तुमच्या जोडीला मी आज सलाम करतो,
आयुष्य भर असेच हसत खेळत रहा असी आशा बाळगतो…
आणि पुढील वाटचालीस तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो…
धन्यवाद
एस आर बन्सोड