वाल्मीक कराडने सरेंडर केले,सरपंच हत्या प्रकरण चौकशीचा भाग सखोल असणार काय?

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

  शुभम गजभिये 

    विशेष प्रतिनिधी

    खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर २२ दिवस पोलिस – सीआयडी वाल्मीक कराडला पकडू शकले नाही. इतकेच नाही तर आज सरेंडर होताना वाल्मिकी कराड स्वतःच्या गाडीतून येतो.महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही! 

         इतके दिवस वाल्मीक कराडला लपायला कोणी मदत केली? कोणाच्या संपर्कात तो होता? कोणाच्या सांगण्यावरून आज सरेंडर झाले या सगळ्यांचे सत्य समोर आले पाहिजे.

              महायुती सरकार आणि मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्याविरोधात जनतेत वाढत असलेला रोष बघता अखेर त्याला वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शक्तींनी सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत का? 

       या वाल्मीक कराडची हिंमत तर इतकी की सरेंडर होण्याआधी हा व्हिडिओ रिलीज करतो आणि स्वतःला क्लिनचीट देतो,यातून त्याच्या मागे खूप मोठी शक्ती असल्याचे स्पष्ट आहे.

       या प्रकरणी पोलिसांनी जे कर्तृत्व दाखवले आहे ते पाहता पोलीस,सीआयडी निष्पक्ष चौकशी करणार काय?हा प्रश्न महाराष्ट्र राज्यातील जनतेला भेडसावतो आहे. 

          त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केली पाहिजे आणि ही चौकशी बीडच्या बाहेर झाली पाहिजे म्हणजे कोणीही दबाव टाकणार नाही असे महाराष्ट्र राज्यातील जनतेला वाटते आहे…