रामदास ठूसे
नागपूर विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमुर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या खंडाळा गावाचा समावेश पेठभान्सुली गटग्रामपंचायत मधे होतो.खंडाळा गावातील ग्रामस्थांना व शालेय विद्यार्थी यांना शिक्षण घेण्याकरीता जीवाची बाजी लावत जंगल परिसरातून पायदळ वारी बसेस सुरू नसल्याने होत असुन यांचा त्रास नागरिकांना व गावातील ६० वर्षावरील वृद्ध व्यक्तीला अनेक दिवसांपासून औषधोपचार दवाखान्यात व बाजार हाट करीता दळणवळण पायदळ वारी करावी लागत असुन यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
बसच्या अभावी खंडाळा-ताडगाव- गिरड मार्गे जवळपास १० खेडे गावं येत असुन दळणवळण करतांनी प्रवाशांचे हाल होत असुन होत असुन बसेस सुरू नसल्याने ६० वर्षावरील वृध्द व्यक्तीची तारेची कसरत होत आहे व शिक्षण घेण्याकरीता शालेय विद्यार्थ्यांची पायदळ वारी होतं आहे.
त्यामुळे चिमुर बसस्थानकावरून दुपारी २ वाजता बस सेवा चिमुर- खंडाळा-ताडगाव- गिरड मार्गे पर्यन्त नियमित सुरू करण्यात यावी अशी मागणी पेठभान्सुली खंडाळ्याच्या सरपंच सौ.तुळसा देविदास श्रीरामे, सामाजिक कार्यकर्ते आकाश श्रीरामे यांनी आगार प्रमुख व्यवस्थापक धाडसे साहेब यांना निवेदनातुन केली आहे….