एड.संतोष कोल्हे यांची राष्ट्रीय एकात्मता विषयावर विचार मांडण्यासाठी मुंबई येथे निवड… — सद्भावना मंच व धार्मिक जन मोर्चा संघ मुंबईचे आयोजन!..

युवराज डोंगरे /खल्लार 

           उपसंपादक

         भारतातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व सुफी संत आणि महापुरुष समान आहेत. ज्यांनी बंधुता आणि न्यायाचा महान वारसा दिला आहे. म्हणूनच आपल्या देशातील विविध धर्मीय बांधवांमध्ये परस्पर सद्भावना आहे.

         पण ही सद्भावना कमकुवत करण्याचे घोर पाप काही लोक करत आहेत अशावेळी सर्व धर्मीय महाराज आणि महंतानी सामाजिक सलोखा राखला पाहिजे आणि तो सुधारण्यासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्यच आहे नवे तर नितांत आवश्यक आहे.

          यासाठी मराठी पत्रकार भवन मुंबई येथे सर्व राज्यातील धर्मगुरूंचा मेळावा दि.२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे सदर मेळाव्यास महाराष्ट्र मधुन येथील जेष्ठ विधिज्ञ तथा.नागरिक हक्क संरक्षण समिती चे अध्यक्ष एड.संतोष कोल्हे यांना राष्ट्रीय सद्भावना व एकात्मता ह्या विषयावर विचार मांडण्यासाठी महाराष्ट्रातुन मुंबई येथील सद्भावना तथा धार्मिक जन मोर्चा संस्थेने विचार मांडण्यासाठी आमंत्रित केले असल्याची माहिती समितीचे सचिव शरद रोहणकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

          एड.संतोष कोल्हे यांच्या ह्या दर्यापुर तालुक्याला अभिमानास्पद असलेल्या निवडी बद्दल विविध सामाजिक संस्थानी त्यांचे अभिनंदन केले आहे.