दिर्घ विज गेल्याने ५०० कोंबड्यांचा मृत्यू ,दिड लाखांचे नुकसान… — साकोली जवळील सोनपूरी येथील घटना, शेतकऱ्याची महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत

[भंडारा जिल्ह्यातील महावितरण चुकीमुळे दूसरी घटना, पहिल्या घटनेत नुकतेच लाखनी येथील १५०० कोंबड्यांचा मृत्यू] 

साकोली : शेतीपूरक कुक्कुटपालन व्यवसायाला दोन लाख ट्रॉन्सफार्मरचे भरून २४ तास विज पुरवठा संलग्न केला असतांना सुद्धा सोनपूरी येथील शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममधील विद्यृत पुरवठा सतत ६ तास खंडीत राहील्याने तब्बल ५०० च्या वर कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २६ जूनला घडली.   

           याबाबत तक्रारदार शेतकऱ्याने या महावितरणच्या दिरंगाईमुळे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आणि हे नुकसान भरपाई भरून देण्याची मागणी तक्रारदार शेतकऱ्याने केली आहे. अन्यथा ग्राहक मंच न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

      सोनपूरी येथील शेतकरी गिरीश प्रकाश कठाणे यांनी बॅंक ऑफ इंडिया मधून १२ लाखांचे कर्ज घेऊन गावीच शेतीपूरक कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला. बुधवार २६ जूनला स. ८ वाजता अचानक येथे विद्यृत पुरवठा खंडित झाला. कठाणे यांनी एकोडी महावितरण अभियंता अमन जीवतोडे यांना फोन केला की, येथे २४ तास वीज पुरवठा संलग्न केला आहे व उष्णतेने पक्ष्यांची दयनीय अवस्था होत मृत्यू पावित आहेत. लाईट गेल्यानंतर येथे त्यांचे ओजल पोल्ट्री फार्मवर कर्मचाऱ्यांनी उष्णतेमुळे पक्षी वाचविण्यासाठी त्यांना थंड पाण्यात टाकून काढणे ही क्रिया करून कोंबड्या वाचविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले पण ते प्रयत्न विफल ठरले. यावर या शेतकऱ्याच्या फोनवर महावितरण अभियंता अमन जीवतोडे यांनी उडवाउडवीची उत्तरे देत विज सुरू होणार नाही असे शेतकऱ्यास फोनवर सांगितले.

         यात ६ तासांपेक्षा जास्त अवधीने विज पुरवठा खंडीत झाला व बुधवारला ४७२ कोंबड्या आणि गुरूवार २७ ला पहाटे ५७ कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला. शेतकरी व कुक्कुटपालन व्यवसायिक गिरीश प्रकाश कठाणे यांनी महावितरणला दोन लाख रूपये भरून ट्रॉन्सफार्मर बसविला जेणेकरून या कुक्कुटपालन व्यवसायाला २४ तास वीज अबाधित राहील. पण महावितरणच्या दिरंगाईमुळे पाचशेच्या वर कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला. यात शेतकऱ्याचे एकुण दिड लाख रुपयांचे नुकसान झाले सदर नुकसान भरपाईची मागणी शेतकरी गिरीश प्रकाश कठाणे यांनी महावितरणकडे केली आहे. 

         “मी गेल्या १० वर्षांपासून शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहे. यासाठी मी बॅंक ऑफ इंडियातून १२ लाख कर्ज घेतले. येथे मी पक्ष्यांची सुरक्षा व्हावी व २४ तास लाईट मिळावी करीता अगावूचे २ लाख खर्च करून ट्रॉन्सफार्मर लावला. पण मला नेहमीच महावितरणकडून विज पुरवठा खंडीत होणे या समस्येला तोंड द्यावे लागते. एकोडी महावितरण अभियंता अमन जीवतोडे यांना तातडीने फोन केला की, माझे पक्षी मरतील. यावर त्यांनी उद्धटपणे बोलून “जे करायचे ते करा लाईट सुरू होणार नाही” या शब्दात बोलले. या महावितरणच्या निष्काळजीपणाने माझे दिड लाखांचे नुकसान झाले. ही नुकसान भरपाईची महावितरणने तातडीने भरून द्यावे अन्यथा मला ग्राहक मंच न्यायालयाचा मार्ग अवलंबिला जाईल” 

गिरीश प्रकाश कठाणे ( शेतकरी ) 

“संचालक” ओजल पोल्ट्री फार्म सोनपूरी ता. साकोली