प्रतिनिधी – मुंबई.

 

मुबई : गेले अनेक दिवस महाराष्ट्रामध्ये राजकीय नाट्य पहायला मिळत आहे. ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचा दावा केला जात आहे. गुहावटीमध्ये असलेले शिवसेनेचे फुटीर आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस यांच्याबरोबर सत्तेत राहण्यास तयार नाहीत हा शिंदे गट भाजपा बरोबर सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे.

भारतीय जनता पार्टी कडून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना पत्र देऊन बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत असे सांगण्यात आले. बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 जूनला सकाळी 11 वाजता अधिवेशन बोलवावे असे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे; त्यामुळे ठाकरे सरकारचीही अग्निपरीक्षा मानली जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकाँग्रेस या पक्षाने देखील आपल्या आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. भाजपाकडून देखील राजकीय हालचालींना वेग आला आहे. बहुमत चाचणी विरोधात शिवसेनेकडूनही याचिका दाखल करण्यात आली आहे.

             राज्यात सरकार स्थापनेसाठी भाजपचा फॉर्म्युला तयार झाला असल्याचे बोलले जात आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण होऊ शकत यावर चर्चा होत आहे. शिंदे गटाच्या आमदारांना सोबत घेऊन भाजप सरकार स्थापन करू शकते, अशी चर्चा असून त्यात खातेवाटपाचा फॉर्म्युला तयार असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने सरकार स्थापन केल्यास देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील. त्याचवेळी उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळणार आहे. शिंदे गटातील 11 आमदारांना कॅबिनेट आणि 3 आमदारांना राज्यमंत्रीपद मिळू शकते. त्याचबरोबर 16 कॅबिनेट आणि 13 राज्यमंत्र्यांसह एकूण 29 आमदार भाजपचे मंत्री होऊ शकतात. 

           भाजपमधून मंत्री होऊ शकतात आशा आमदारांची नावे पुढे येत आहेत. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गणेश नाईक, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, संजय कुटे, मदन येरावार, चंद्रशेखर बावनकुळे, संभाजी निलंगेकर, सुभाष देशमुख/विजय देशमुख, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, रामकुमार जाधव, राधाकृष्णराव पाटील.

 

राज्यमंत्री होऊ शकतात – राहुल कुल, गोपीचंद पडळकर, नितेश राणे,

जयकुमार गोरे किंवा शिवेंद्रराजे, राम सातपुते, रणजितसिंह मोहिते पाटील, अतुल सावे, योगेश सागर, संदीप धुर्वे, रणजित सावरकर, देवयानी फरांदे, राणा जगजित सिंग, मेघना बोर्डीकर.

 

शिंदे गटातून – भरत गोगावले, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संजय राठोड, शंभूराज देसाई, बच्चू कडू, तानाजी सावंत यांना मंत्री केले जाऊ शकते.

राज्यमंत्री- संदिपान भुमरे, संजय शिरसाट

       सध्याच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. मात्र, भाजप सरकारमध्ये मागील मंत्रिमंडळ प्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: ही खाती स्वत:कडे ठेवतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बहुमत चाचणीसाठी उद्या मुंबईत हजर राहणार असल्याचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. 

 

दखल न्यूज भारत.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com