राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाची दोन सदस्यीय टिम चंद्रपूरात दाखल… — दिनांक २९ जानेवारी २०२५,रोज बुधवारला सकाळी मौजा कुसुंबीत दाखल होणार… — तलाठी विनोद खोब्रागडे व आनंदराव मेश्राम यांनी केली होती तक्रार….

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक 

       आज,दिनांक २८/०१/२०२५ रोजी मा.राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग नई दिल्लीची दोन सदस्यीय टीम चंद्रपूरात दाखल झाली आहे.सदर टिममध्ये मा. प्रजाप्रती व मा.गोवार्धन मुंडे यांचा समावेश आहे.

       चंद्रपूर जिल्हातंर्गत जिवती तालुक्यातील मौजा कुंसुबी गावात उद्या सकाळी ८.०० वाजता प्रत्यक्ष भेट देऊन वास्तव प्रकरणातंर्गत पाहणी करून,२४ आदीवासींची समस्या जाणून निर्णय घेणार आहेत.

       संघर्षी आयु.विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी,जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याचे विद्यार्थी,भारतीय संविधानाचे अभ्यासक यांनी,तक्रारीला अनुसरून पुराव्यानिशी प्रकरणाची मा.राष्टीय जनजाती आयोग नई दिल्ली यांना आज सकाळी माहिती दिली व गंभीर प्रकरण समजावून सांगितले आहे.

        जिल्हाधिकारी चंद्रपूर हे वारंवार खोटे बनावट बोगस शपथपत्र दाखल करुन दिशाभूल करणारी माहिती वरिष्ठांना देत होते.

         अखेर,कुंसूबीचा आदिवासी प्रकारणात मा.राष्टीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष,श्री.आंतर सिंह आर्य,नई दिल्ली यांनी अनुसंधान अधिकारी,श्री.गोवर्धन मुंडे,श्री.प्रजाप्रती सह शिष्टमंडळ यांची नेमणूक करुन प्रतक्ष चंद्रपूर जिल्हातंर्गत जिवती तालुक्यातील मौजा कुंसुबी गावात भेट देऊन पाहणी करावी आणि मानीकगड सिमेंट कंपनी विरुद्ध व अधिकाऱ्यांविरुद्ध अँक्शन घेन्याचे निर्देश दिले आहेत.दिनांक २८/०१/२०२५ ते ३०/०१/२०२५ दौऱ्यात पाहणी करणार आहेत..

        त्यानुसार आज दिनांक २८/०१/२०२५ रोजी चंद्रपूर येथे दाखल झाले असून,आज जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा कार्यालयात बैठक पार पडली असून उद्या सकाळी ८.०० वाजता मौजा कुंसूबी गावात प्रत्यक्ष भेट देऊन २४ आदिवासी ची समस्या जाणून घेणार आहेत व त्यावर वरिष्ठ अधिकारी व कंपनी व्यवस्थापक यांना निर्देश देणार आहे.

*****

वरिष्ठ महसूल अधिकारी मध्ये प्रचंड खळबळ..‌

       जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा जी सी,श्रीमती नैना गुंडे आदिवासी आयुक्त,श्री.रवींद्र ठाकरे अपर आदिवासी आयुक्त नागपूर,श्री.जितेंद्र चौधरी अपर आयुक्त अमरावती यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते व उपस्थित झाले.

       विनोद कुमार खोब्रागडे पटवारी तथा जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याचे विद्यार्थी,भारतीय संविधानाचे अभ्यासक यांनी व आनंदराव मेश्राम यांनी गंभीर तक्रार केली होती.

       दिनांक ०७/०१/२०२५ रोजी दिल्ली येथे सुनावणी झाली होती व १५ दिवसांत वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना मागितला होता.मात्र आजपर्यंत वस्तुनिष्ठ अहवाल चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केला नाही.

         अखेर राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग नई दिल्लीची दोन सदस्यीय टिम चंद्रपूर जिल्हातंर्गत जिवती तालुक्यातील मौजा कुंसूबी गावात उद्या थेट भेट देऊन पाहणी करणार आहेत.

       दिनांक ०७/०१/२०२५ रोजी दिल्ली येथे सुनावणी दरम्यान जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी सुट्टीवर असल्याने प्रभारी जिल्हाधिकारी श्री.विवेक जांन्सन यांना वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते,मात्र त्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला नाही.

       दिनांक १३/०१/२०२५ रोजी पुन्हा मा.आयोगाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पत्र देऊन पुराव्यानिशी १५ दिवसात अहवाल मागितला होता.मात्र त्यांनी अहवाल दिला नाही…

      दिनांक २३/०१/२०२५ रोजी मा.राष्टीय,अनुसंधान अधिकारी जनजाती आयोग नई दिल्ली यांनी चंद्रपूर दौरा काढला आहे.

      ज्याअर्थी मे.मानीकगड सिमेंट कंपनी व अल्ट्राटेक सिमेंट कंपनी यांनी दिनांक ०२/०२/२०२२ रोजीच अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात मौजा कुंसूबीच्या २४ आदीवासीनां ४२ वर्षापासुन न्याय व हक्क,मोबदला दिला नाही,मात्र देण्यात येईल असे सांगितले व लिहून दिले आहे.

       त्याअर्थी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी १९८५ लाच मोबदला दिला,पन पुरावा रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून बोगस,बनावट,खोटे,शपथपत्र सादर करून महाराष्ट्र शासनाची,व आयोगाची दिशाभूल व फसवणूक करीत होते.

     एवढेच नव्हे तर,मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे सुद्धा बोगस बनावट खोटे शपथपत्र दाखल करुन न्यायालयाची फसवणूक तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी केली होती.

        जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी आपल्या पगारातून कुंसूबीचा आदिवासीनां मोबदला दिला आहे काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

       तक्रारदार विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी तथा जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याचे विद्यार्थी,भारतीय संविधानाचे अभ्यासक यांनी वारंवार जिल्हाधिकारी चंद्रपूर बोगस,बनावट,खोटे,शपथपत्र मा.राष्टीय अनुसूचित जनजाती आयोग दिल्ली यांना देत असल्याबद्दल अट्रासिटीच्या कलमानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांचावर फौजदारी गुन्हा दाखल करावे असे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा समक्ष सुनावणी मध्ये आयोगाला सांगितले होते.

     मा.आयोगाने पहिल्यांदा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना नोटीस इशु केले होते,नंतर जिल्हाधिकारी चंद्रपूर विनय गौडा जी सी यांना समन्स बजावले होते‌.त्यानंतर थेट अटक वॉरंट जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा जी सी यांच्या वर मा.आयोगाने काढले होते.

          आता अट्रासिटीचा कलमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करेनच बाकी राहिले आहे,ते सुद्धा १५ दिवसांत वस्तुनिष्ठ अहवाल दिले नाही तर गुन्हा दाखल होणारच असे वास्तव आहे.

       जर वस्तुनिष्ठ अहवाल मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी दिला नाही,तर ४२ वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या सर्व जिल्हाधिकारी यांच्यावर मा.आयोग भारतीय संविधानातील अनुच्छेद ३३८ सि नुसार वापर करून मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा वर अट्रासिटीचा कलमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करणार काय? हा प्रश्न सध्यातरी अनभिज्ञत आहे.

        मौजा कुसुंबी प्रकरणाकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्र व भारतातील आदिवासी बांधवांचे,व इतर समाज बांधवांचे लक्ष लागलेले आहे.

*****

विशेष बाब…

   एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही…

    कायद्यापुढे सर्व समान आहेत,मग कुनीही असु द्या.

     सणदी अधिकारी यांनी निःपक्षपने काम करावे व गरीब,वंचित,शेतकऱ्यांना न्याय व हक्क मिळवून द्यायला पाहिजे.

       मात्र तेच जर शोषण करु लागले तर प्रशासना बाबत समाजात विश्वास राहनार नाही..

******

जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागले पाहिजे?

       जी घटना ३०/०४/१९७९ पासून कुंसूबीचा २४ आदिवासी प्रकारणात,एक तलाठी,पटवारी,जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याचे विद्यार्थी,भारतीय संविधानाचे अभ्यासक आयु.विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांना तिन दिवसांत निदर्शनास आले व त्यांना न्याय व हक्कासाठी पाठपुरावा करीत आहे,ति घटना ४२ वर्षापासुन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा निदर्शनास आणून सुद्धा लक्ष का दिले नाही?

      खाजगी कंपन्यांच्या लाभा साठी महसूलचे वरिष्ठ अधिकारी कामे करत आहेत काय?असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे.

       संबंधित सर्व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची अवैध प्रापर्टी CBI,ED,ACB,SIT, यांनी जप्त करावी अशी मागणी प्रेस नोट द्वारे पत्रकार परिषदेत केली आहे.

******

जनहितार्थ जारी….

 समाजहितासाठी,देशहितासाठी, राष्ट्रबांधनीसाठी,लोकशाही बळकट करण्यासाठी,संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे..

 धन्यवाद!

******

टिप: जिवती तालुक्यातील,संजय गांधी निराधार योजनेचे मय्यत लाभार्थींच्या नावाने अनेक वर्षांपासून रुपये काढून करोडो रुपयांचा निधी २०१८ पासून आजपर्यंत तत्कालीन तहसीलदार,उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी,कर्मचारी यांनी हडप केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र यांना गंभीर रिपोर्ट वरोरा पोलिस निरीक्षक मार्फत केली आहे…

फिर्यादी….

     संघर्षी आयु.विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक,कायद्याचे विद्यार्थी,संविधानाचे अभ्यासक,सामाजिक कार्यकर्ते,लोकसेवक,पटवारी,प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा RTI कार्यकर्ते वरोरा,जिल्हा चंद्रपूर व २४ कुंसुबीचे असली आदिवासी..

— ९८५०३८२४२६..‌‌.

— ८३२९४२३२६१…