दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : पंजाब मधील भट्टिवाल या गावातून संत नामदेव जवळीच जंगलात येऊन वसले होते तिथे ते कीर्तन-भजन करत असत त्यांचे भजन ऐकून लोक भेटण्यासाठी येत. यासाठी त्यांनी पंजाबी भाषा आत्मसात केली होती. यामुळे नामदेवांच्या उपदेशाने अनेकांना आयुष्याचा मार्ग सापडला. लोकांमध्ये नामदेव महाराजांबद्दल श्रद्धा निर्माण झाली. या प्रवचनांमधून आणि किर्तनांमधून त्यांनी गावातील अनेक वाईट चालीरिती, व्यसने याविषयी लोकांचं प्रबोधन केले त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकामध्ये आम्हाला संत नामदेव महाराज दिसत असल्याचे पंजाब येथील नामदेव दरबारचे सचिव सुखजिंदर सिंग बाबा यांनी आळंदी येथे बोलताना सांगितले.
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी पंजाब येथील घुमान मधील घुमानचे सरपंच नरींदर सिंग निंदी, नामदेव दरबार कमिटीचे सचिव सुखजिंदर सिंग बाबा, सहसचिव मनजिंदर सिंग बिट्टू,सरबजसिंग बाबा,गुरुशरणसिंग हे आळंदी दौऱ्यावर आले होते. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे पुजन करुन दर्शन घेतले, यावेळी आळंदी देवस्थान चे सह व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
याप्रसंगी पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुर्यकांत भिसे, सचिव विलास काटे, अजित वडगावकर, विठ्ठल शिंदे, मनोज मांढरे, राजेंद्र कापसे, जयश्री जाधव, सुरेखा पोकणे, निरुपमा भावे, जनार्दन पितळे, डॉ.विलास वाघमारे, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुर्यकांत भिसे यांनी यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या विषयी विस्तृतपणे माहिती दिली.