तालुक्यात अवैध रेती उत्खननावर एलसिबीचि कार्यवाहि ….. स्थानिक महसूल,पोलिस विभागाच्या कार्यप्रणालिवर प्रश्नचिन्ह…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

          तालुक्यातील एकही रेती घाट लिलाव झालेले नाहीत मात्र सावली पोलीस स्टेशनच्या व सावली तहीलदारांच्या कार्यक्षेत्रात दिनांक २५/1/ २०२५ रोजी अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर गुप्त माहिती च्या आधारे चंद्रपूर गुन्हे शाखा च्या पोलिस पथकाने धडक कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला.

           अवैध रेती उत्खनन व वाहतुकीच्या वाढत्या प्रकारांनी परिसरातील नैसर्गिक संसाधनांवर विपरीत परिणाम आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जात होत्या. यामुळे गुन्हे शाखा विभागाने परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत प्रभावी पाऊल उचलले. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, काही माफिया टोळ्या अवैधरित्या रेती उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करत असल्याचे समजले.

          त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखा विभागाने त्वरित कारवाई करत घटनास्थळी छापा टाकला. या कारवाई दरम्यान, सामदा घाटातील रेती वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर ट्रॉलीसह ज्यामध्ये अंदाजे ०३ ब्रास रेती वाहतूक केली जात होती. सुमारे ₹१२,००,००० किमतीचे ३ ट्रॅक्टर व ट्रॉलीसह जप्त केले. तसेच, रेतीचा अंदाजे बाजारमूल्य ₹१५,००० असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹१२,१५,००० इतकी आहे.सदर प्रकरणी अपराध क्रमांक १९/२०२५ नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ३०३ (२), २२३, व ३(५) BNS अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आले.

            नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासंबंधी कठोर शिक्षा देण्यासाठी वापरण्यात येतात. या यशस्वी कारवाईत पोलीस हवालदार प्रकाश बलकी, पोलीस सुभाष गोहोकर, व पोलीस अंमलदारमिलिंद जांभुळे यांचा महत्त्वाचा सहभाग होता. चंद्रपूर स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने हि मोहीम हाती घेतली व रात्रौ च्या वेळेस सापळा रचून पकडण्यात यशस्वी झाले. 

           अवैध रेती उत्खननामुळे परिसरातील पर्यावरणावर गंभीर परिणाम, धुळे मुळे व कर्कश आवाज रात्रौ भर नागरिकांची झोप उडवून रेती वाहतूक केली जाते त्यामुळे नागरिकाच्या आरोग्य समस्या होत असल्याची नागरिकांची चर्चा आहे..नद्यांची खोली वाढल्यामुळे भूजलपातळी खालावली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीस पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

            याशिवाय, अवैध वाहतुकीमुळे स्थानिक रस्त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारली जाणार का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.    

               सावली तालुक्यातील पोलीस स्टेशन चे ठाणेदार, आणि सावली तहसील कार्यालय तहीलदारांसह प्रशासनानी मूंग गिळून गप्प असल्याने व रेती माफिया सोबत सटे लोटे असल्याचे तालुक्यात मोठी चर्चा नागरिकात केली जात आहे. स्थानिक प्रशासनातील अधिकारी जबाबदारी समजत नसतील व जिल्ह्यातील विभागाला लक्ष घालावे लागत असेल तर हे मात्र निस्क्रिय अधिकारी काय कामाचे असे प्रश्न नागरिकात निर्माण होत आहे या कारवाईने अवैध रेती माफियांना मोठा धक्का बसला आहे.

            मात्र, हे प्रकरण केवळ पोलिसांच्या कारवाईपुरते मर्यादित न ठेवता, प्रशासनाने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याची गरज आहे. स्थानिक आमदार, खासदार व मंत्र्यांनी या विषयावर गांभीर्याने विचार करत खालील पावले उचलणे अपेक्षित आहे.

   अवैध उत्खनन रोखण्यासाठी नद्यांच्या किनाऱ्यावर सतत निरीक्षण ठेवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर.

• अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाईसाठी प्रभावी कायदे व नियमांची अंमलबजावणी.

• स्थानिक पातळीवर जनजागृती मोहिम राबवून नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणाची महत्त्वाकांक्षा नागरिकांपर्यंत पोहोचवणे.

• पर्यावरणीय अभ्यास करून रेती उत्खननासाठी परवाना व मर्यादा निश्चित करणे.

           अवैध रेती उत्खनन ही समस्या केवळ सावली किंवा चंद्रपूर पुरती मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्रभर ती तीव्र झाली आहे. नद्यांमधील अवैध उत्खननामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. नैसर्गिक संसाधनांच्या विनाशाला प्रशासनातील काही घटकांची दुर्लक्षताही कारणीभूत ठरली आहे. परिणामी, या गंभीर प्रश्नावर कठोर उपाययोजना आखणे व दीर्घकालीन धोरणांची अंमलबजावणी करणे ही शासनाची प्राथमिकता असली पाहिजे. 

             चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा विभागाने केलेली कारवाई निश्चितच प्रशंसनीय आहे. मात्र, फक्त कारवाई पुरेसे ठरत नाही, तर प्रशासनाला या समस्येच्या मुळावर प्रहार करावा लागेल. नियमांची कडक अंमलबजावणी आणि जनतेच्या सहभागातूनच या प्रश्नावर तोडगा काढता येईल.

            सावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रेती उत्खननाविरुद्धची धडक कारवाई म्हणजे प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा एक सकारात्मक दाखला आहे. यामुळे पर्यावरण रक्षणासह कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सकारात्मक संदेश गेला आहे. भविष्यात या प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक, प्रशासन सामदा घाट, साखरी, उसेगाव, बोरमाळा, सिर्शी व इतर रेती उत्खनन वर पुढे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे……