
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था असुन भारतीय राज्यघटनेचे स्वतंत्र आणी निष्पक्ष निवडणूका घेण्यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे. राज्यघटनेचे निवडणूक आयोगाला देशातील संपूर्ण निवडणूकांचे निर्देश आणी नियंत्रण करण्याचे अधिकार दिले आहेत.
लोकशाही शासन व्यवस्थेत निवडणूक आयोगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. देशातील निवडणूका मुक्त आणी निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. आणी निवडणूकीत मतदार हा राजा असतो परंतु मागील काही वर्षातील निवडणूक आयोगाची भुमीका पाहता ती पक्षपाती दिसत आहे.
महाराष्ट्रात नोव्हेंबर २०२४ मध्ये विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या आणी निवडणूकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय, आश्चर्यकारक, अविश्वसनीय व काहीतरी गडबड असल्याचे दिसले. राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजपा यंतीच्या विरोधात होती.
सहा महीण्यापुर्वीच लोकसभा निवडणूकीत सत्ताधारी पक्षाचे पानीपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते. अवघ्या सहा महीण्यात हे चित्र पुर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. मतदार यादयांमध्ये घोटाळा करण्यात आला, या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करुनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला.
लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या सहा महीण्याच्या अंतरात तब्बल ५० लाख मतांची वाढ कशी झाली मतदानादिवशी संध्याकाळी ५ वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यामध्ये मोठी तफावत आहे.
यातही ७६ लाख मतदान वाढलेले दाखवले आहे. सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था होती. त्यामूळे मतदार यादयातील घोळ, रात्रीच्या अंधारात वाढलेले ७६ लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने दयावेत अशी मागणी कॉग्रेस पक्षाने केली असता आजपर्यंत ही माहीती देण्यात आलेली नाही.
राज्यातील मतदारांचाही विधानसभेच्या निकालावर विश्वास बसलेला नाही, आपले मतदान चोरले गेल्याची भावना जनतेत आहे. जनतेची ही भावना महत्वाची आहे. आज दिनांक २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जात आहे. या दिवसाचे औचित्य साधुन कॉग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा पर्दापाश करत आहे.
निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता निष्पक्ष व पारदर्शक निवडणूका घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे तसेच लोकशाहीचे रक्षण आणी मतदारांचा आदर सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबधित राहील याकडे निवडणूक आयोगाने लक्ष दयावे यासाठी चिमूर विधानसभा समन्व्यक डॉ. सतिशभाऊ वारजुकर यांच्या उपस्थिती मध्ये तालुका काँग्रेस कमिटी चिमूर यांच्या वतीने तहसीलदार साहेब चिमूर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने सेवादल महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रा. राम राऊत सर,चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस गजानन बुटके,चिमूर तालुका अध्यक्ष डॉ. विजयजी गावंडे,तालुका सचिव विजय डाबरे, घनश्याम चाफले सर,लोकनाथ रामटेके, मधुकर मुंगले, पप्पू शेख,राजू चौधरी,बाळकृष्ण बोबाटे,प्रशांत डवले,नागेद्र चट्टे, रामटेके साहेब,दुधनकर साहेब,राकेश साटोणे, राहुल पिसे, श्रीकांत गेडाम, नामदेव डोये ,कल्पना ताई इंदूरकर, वर्षा ताई शेन्डे, सुरेखा सेंबेकर,शेनाज अन्सारी उपस्थित होते.