निरा डाव्या कालव्यातून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी यापुढील काळात उन्हाळा हंगामात दोन आवर्तने सोडली जाणार.. — तर नवा मुठा उजवा खडकवासला कालव्यातून येत्या चार मार्चपासून पहिले आवर्तन सोडले जाणार… — आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती…

  बाळासाहेब सुतार 

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

      निरा व मुठा कालव्यातून शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्था सुरळीत करण्यासंबंधाने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक झाली.

         या बैठकीला पालकमंत्री अजित पवार,आमदार दत्तात्रेय भरणे,आमदार राहुल कुल,कार्यकारी संचालक अतुल कपोले,अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप,कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे,पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार,जिल्हाधिकारी सुहास दिवसे,अभियंता श्री.गुलाने व इतर पाटबंधारे अधिकारी उपस्थित होते.

     आमदार भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी उन्हाळी दोन आवर्तन सोडण्यात यावे अशी आग्रही मागणी यावेळी बैठकीत केली.यावेळी उन्हाळी हंगामातील पहिले आवर्तन संपल्यानंतर खडकवासला प्रकल्पातील पाण्याचा अंदाज घेऊन श्री.भरणे यांच्या मागणीनुसार दुसरे आवर्तन उन्हाळी हंगामातील पिकांसाठी सोडण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.