वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे
कामरगांव— प्राण घातक हल्ल्यात बाप लेक गंभीर जखमी झाल्याची घटना 20 जुन ला रात्री साडे 10 वाजताच्या दरम्यान कामरगाव बसस्थानकापासुन कांरजा मार्गावर हाकेच्या अंतरावर घडली. या हल्ल्यात राजेश पाचपोर व प्रसाद राजेश पाचपोर हे बापलेक गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी अमरावती येथील इरवीन हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असुन तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान विशाल पाचपोर यांनी सदर प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून दाखल तक्रारीवरून आरोपी नईम खाॅ रहीम खाॅ, सिमरन शेख, शेख सलीम, शेख मोहसीन व इरफान काजी या पाच आरेापीविरूध्द भादविच्या कलम 143, 147, 148, 149, 307, 324 व 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उधारी मागण्याच्या कारणावरून हा प्राण घातक हल्ला झाल्याचे बोलल्या जात आहे. आरेापीतील एकजण नेहमी चाकु घेउन गावात हिंडत असल्याचे देखील सांगीतल्या जाते. या हल्ल्यात राजेश पाचपोर व प्रसाद पाचपोर यांच्या पोटावर हल्लेखोरांनी चाकुने वार केल्याची माहिती सुत्रांणी दिली आहे. पंधरवड्यात कामरगांव येथील ही तिसरी घटना आहे.
दरम्यान कांरजाचे पोलिस उपविभागीय अधिकारी जगदीश पांडे यांनी रात्री कामरगाव येथे भेट देउन घटनेची माहिती घेतली आणि पुढील संभाव्य अनुचीत प्रकार टाळण्यासाठी पोलिस बदोंबस्तात वाढ केली. घटनेचा अधिक तपास ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात कामरगाव पोलिस चैकीतील पेालिस उपनिरीक्षक अर्जुन राठोड व सहकारी करीत आहे.कामरागावं येथे पोलीस स्टेशन द्या…. बडूभाऊ इंगोले
कामरगाव हे तालुक्यातील सर्वात सर्वात मोठी बाझार पेठ असून येथे ३५ ते चाळीस गावाचा संपर्क आहे .येथील सामाजिक स्वास्थ कायम अबाधित ठेवणे ही पोलीस यंत्रने पुढं कायम आव्हान राहिले आहे तसे पाहता लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस चौकी ला असलेलं मनुष्य बळ हे अतिशय अपुर आहे यथे नेहमी व्ययक्तीक भडणाचे रूपांतर हिंदू मुसलमान भाडनात होऊन जातीय स्वरूप घेत असल्याने पोलीस यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरत असल्याने येथील तंटे वाढत आहेत .येथील धनज पोलीस स्टेशन चा कामरगावं तुलनेत अतिशय कमी लोकसंख्या असलेलं शांत गाव परंतु इंग्रज कालीन पोलीस स्टेशन येथे आहे आणि त्या अंतर्गत
कामरगावं येत आहे त्यामुळे यात समन्वय राहत नाही .येथील
पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे यांची बदली करावी कारण हे ठाणेदार कायम नॉट रीचेबल राहत असल्याने पोलीस यंत्रने समोर आपल्या अधिकारी शिवाय कार्य करताना प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे .त्यामुळे कामरगाव येथे पोलीस स्टेशन होणे गरजेचे आहे ही मागणी फार जुनी असून प्रशासन स्थरावर कार्य वाही करून त्याला लवकर कार्यान्वित करून कामरगाव येथे पोलीस स्टेशन देण्यात यावे अशी मागणी
कामरगाव तालुका कृती समितीचे अध्यक्ष
बंडूभाऊ इंगोले यांनी केली आहे.
आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत