प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चंद्रपूर जिल्ह्यात ४२ वर्षापासुन आलेल्या सर्व आजी,माजी जिल्हाधिकारी यांनी मौजा कुंसूबीच्या आदिवासी प्रकारणातंर्गत कर्तव्यात कसूर केल्यामुळे अट्रासिटीचा कलम ४ नुसार,व भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ नुसार फौजदारी गुन्हा दाखल होणारच, असा आशावाद तलाठी विनोद खोब्रागडे यांना आहे.
जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना १५ दिवसांत वस्तुनिष्ठ अहवाल कुंसूबीचा २४ आदिवासी च्या प्रकरणात सादर करण्याचे आयोगाचे दिनांक १३/०१/२०२५ ला दिले निर्देश अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अनंत सिंह यांनी दिले आहेत.
दिनांक ०७/०१/२०२५ रोजी दिल्ली येथे सुनावणी दरम्यान जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी सुट्टीवर असल्याने प्रभारी जिल्हाधिकारी श्री.विवेक जांन्सन यांना निर्देश दिले होते, मात्र त्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर केलाच नाही.
दिनांक १३/०१/२०२५ रोजी पुन्हा मा.आयोगाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पत्र देऊन पुराव्यानिशी १५ दिवसात अहवाल मागितला आहे.
ज्याअर्थी मे.मानीकगड सिमेंट कंपनी व अल्ट्राटेक सिमेंट कंपनी यांनी दिनांक ०२/०२/२०२२ रोजीच अप्पर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात कुंसूबीचा २४आदीवासीनां ४२ वर्षापासुन न्याय व हक्क,मोबदला दिला नाही,मात्र देण्यात येईल असे सांगितले व लिहून दिले आहे.
त्याअर्थी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी १९८५ लाच मोबदला दिला,पन पुरावा रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून बोगस,बनावट,खोटे,शपथपत्र सादर करून महाराष्ट्र शासनाची,व आयोगाची दिशाभूल व फसवणूक करीत होते.
जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी आपल्या पगारातून कुंसूबीचा आदिवासीनां मोबदला दिला आहे काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे?
तक्रारदार विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे पटवारी तथा जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक यांनी वारंवार जिल्हाधिकारी चंद्रपूर बोगस,बनावट,खोटे,शपथपत्र मा.राष्टीय अनुसूचित जनजाती आयोग दिल्ली यांना देत असल्याबद्दल अट्रासिटीचा कलमानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांचावर फौजदारी गुन्हा दाखल करावे असे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा समक्ष सुनावणी मध्ये आयोगाला सांगितले होते.
यामुळे मा.आयोगाने पहिल्यांदा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना नोटीस इशु केले होते,नंतर जिल्हाधिकारी चंद्रपूर विनय गौडा जी सी यांना समन्स बजावले होते.
त्यानंतर थेट अटक वॉरंट जिल्हाधिकारी चंद्रपूर श्री.विनय गौडा जी सी यांच्या वर मा.आयोगाने काढले होते.
आता अट्रासिटीचा कलमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करेनच बाकी राहिले आहे,ते सुद्धा १५ दिवसांत वस्तुनिष्ठ अहवाल दिले नाही तर गुन्हा दाखल होणारच असा आशावाद तलाठी विनोद खोब्रागडे यांना आहे.
जर दिनांक २८/०१/२०२५ पर्यंत वस्तुनिष्ठ अहवाल जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी दिला नाही,तर ४२ वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या सर्व जिल्हाधिकारी यांच्यावर मा.आयोग भारतीय संविधानातील अनुच्छेद ३३८ सि नुसार वापर करून जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचावर अट्रासिटीचा कलमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करनार काय?याकडे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील,भारतातील आदिवासी बांधवांचे,व इतर समाज बांधवांचे लक्ष लागलेले आहे.
एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही.कायद्यापुढे सर्व समान आहेत,मग कुणीही असु द्या,सणदी अधिकारी यांनी निःपक्षपने काम करावे व गरीब,वंचित,शेतकऱ्यांना न्याय व हक्क मिळवून द्यायला पाहिजे.मात्र तेच जर शोषण करु लागले तर समाजात प्रशासनाप्रती विश्वास राहणार नाही.
जी घटना ३०/०४/१९७९ पासून कुंसूबीचा २४ आदिवासी प्रकारणात,एक तलाठी,पटवारी,जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा भारतीय संविधानाचे अभ्यासक आयु. विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे यांना तिन दिवसांत निदर्शनास आले व त्यांना न्याय व हक्कासाठी पाठपुरावा करीत आहे,ति घटना ४२वर्षापासुन मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा निदर्शनास आणून सुद्धा लक्ष का दिले नाही?
खाजगी कंपन्यांच्या लाभासाठी महसूल चे वरिष्ठ अधिकारी कामे करत आहेत काय असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे?
संबंधित सर्व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची अवैध प्रापर्टी CBI,ED,ACB,SIT,यांनी जप्त करावी अशी मागणी यापूर्वीच पत्रकार परिषदेत केली आहे.
*****
जनहितार्थ जारी…
समाजहितासाठी,देशहितासाठी, राष्ट्रबांधनीसाठी,लोकशाही बळकट करण्यासाठी,संविधान संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी जागृत राहावे…
धन्यवाद!
*****
टिप: जिवती तालुक्यातील,संजय गांधी निराधार योजनेचे मय्यत लाभार्थींच्या नावाने अनेक वर्षांपासून रुपये काढून करोडो रुपयांचा निधी २०१८ पासून २०२१-२२ पर्यंत तत्कालीन तहसीलदार व उपजिल्हाधिकारी,व जिल्हाधिकारी ,व कर्मचारी यांनी हडप केल्यामुळे लवकरच हा महाघोटाळा सुद्धा दस्तऐवज पुराव्यानिशी विनोदकुमार खोब्रागडे पटवारी उघडकीस आननार आहे..
*****
फिर्यादी…
संघर्षी आयु.विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे हे जबाबदार,जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी,संविधानाचे अभ्यासक,सामाजिक कार्यकर्ते,लोकसेवक,पटवारी,प्रकल्पग्रस्त शेतकरी,RTI कार्यकर्ते आहेत.
रा.वरोरा,जिल्हा चंद्रपूर..
— ९८५०३८२४२६…
— ८३२९४२३२६१…