डॉ.बाबासाहेब आंबेडकराची धम्म क्रांती संविधानात्म्क बौद्ध राष्ट्र निर्मिती आहे :- समतादुत प्रज्ञा राजूरवाडे..  — शिवणपायली येथील धम्मचक्र प्रवर्तन कार्यक्रमात प्रतिपादन…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

     डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 ला अशोक विजयादशमीदिनी नागपुरच्या पवित्र दिक्षाभूमीवर धर्मांतर करून जे युध्दाने जिंकता येत नाही ते बुद्धाच्या धम्माने जिंकता येते अशी धम्म क्रांती करुन जगाला प्रथम बौद्ध धम्म हा विश्वधर्म दिला असल्याचे प्रतिपादन बार्टीच्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी शिवणपायली येथील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या प्रसंगी केले.

        तथागताचे तत्वज्ञान विश्व शांती,पंचशिलाचा संदेश देणारे,मानवतेच्या रक्षनासाठी मार्गदर्शक आहे.ही मानवी कल्याणाच्या वीजयाची मानवतावादी धम्म क्रांती आहे.

      भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील नागरिकांना सन्मान व भेदभाव रहित जिवन जगन्याचा अधिकार दिला.

       तर धर्मांतराने संपुर्ण मानव कल्याणासाठी आपले जिवन सुखी,आनंदी,करण्याचा बौद्ध धम्म मार्ग दाखविला.म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली तथागताची धम्म क्रांती ही संविधानात्म्क बौद्ध राष्ट्रच आहे असे प्रतीपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी शिवनपायली येथे केले.

         नागसेन धम्मकूटी मिलिंद स्मारक मंडळ बौद्ध पंच कमेटी नवयुवक युवा शाखेच्या वतीने 68 व्या धम्मचक्र प्रवर्तदिन व विजयादशमी सोहळ्याचे आयोजन केले होते त्यावेळी आपल्या प्रमुख मार्गदर्शनात त्या बोलत होत्या.

        या कार्यक्रमाचे बौद्ध पंचकमेटी अध्यक्ष अंबादास पाटील होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बार्टीच्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे,प्रमुख पाहुणे एकनाथ गोंगले,सिमाताई रामटेके,बेबीताई डेकाटे,नदाताई खोब्रागडे,कवडु पाटील,मेघराज खोब्रागडे,विस्वनाथ मेश्राम,शोभाताइ डेकाटे, उपस्थीत होते.

        पुढे बोलताना समतादुत प्रज्ञा राजूरवाडे म्हणाल्या की सम्राट अशोकाच्या काळात भारत देश हा बौद्धमय होता. जगातिल पहीली आर्थिक महासत्ता होता म्हणुन बौद्ध धम्माचा प्रचार हे संविधानात्म्क चळवळ आहे,बौद्ध धम्म कर्मकाण्ड नाकारुन मानसीकता बदलण्याची व जिवन जगण्याची प्रक्रिया आहे.

       पंचशिल त्रिशरण,अष्टांगिक मार्ग,22 प्रतिज्ञा विश्व मानवी कल्याणाचे धार्मीक,मानसिक, शैक्षणिक,राजकीय,आर्थिक क्षेत्रात परिवर्तन करण्याची आणि समता,बंधूताची न्याय परंपरा आहे.

      जगाला युध्द नको आहे बुध्द हवा आहे,यासाठी आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली धम्म क्रांती शीकवली पाहीजे‌.जे बुद्धाला लोककल्याणकारी समाजाचे रुप अभीप्रेत होते,तेच संविधानात आहे.

       म्हुणन बौद्ध धम्माचा प्रचार करणे ही मानवसेवा आहे असे सविस्तर मार्गदर्शन समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्धन डेकाटे यांनी केले तर प्रास्ताविक बालकदास पाटिल यांनी केले‌त.उपस्थितांचे आभार प्रफुल रामटेके यांनी मानले.