सर्व सन्माननीय जिल्हाध्यक्ष/ तालुकाध्यक्ष..
चंद्रपूर /गडचिरोली / भंडारा/ गोंदिया/नागपूर जिल्हा..
राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई.
स.न.
पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी,न सुटलेल्या मागण्या सोडविण्यासाठी व लोकशाहीच्या संरक्षणासाठी राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मा.वसंत मुंडे साहेब यांचे नेतृत्वात” पत्रकार संवाद यात्रा” दिक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय अशी निघत आहे.यात विवीध संघटना,राजकिय पक्ष यांच्या पाठिंब्याने या संवाद यात्रेला आपणास सफल करावयाचे आहे.
दि.२८ जुलै २०२४ ला पवित्र दिक्षाभूमीतून या ऐतिहासीक पत्रकार संवाद यात्रेचा शुभारंभ सर्व पत्रकार बांधवाच्या साक्षीने अपेक्षीत आहे.
राज्य पत्रकार संघाचे सर्व जिल्हा/ तालुका/शाखा पदाधिकारी व सदस्यांनी दि.२८ जुलै २०२४ ला दिक्षाभूमी नागपूर येथे सकाळी ११ वाजता स्वयंप्रेरणेने उपस्थित राहावे हि नम्र विनंती.