रत्नदिप तंतरपाळे

 चांदुर बाजार तालुका प्रतिनिधी

        अमरावती जिल्ह्यात सुरु असलेले सरकारी कर्मचारी यांचे आंदोलन तीव्र स्वरूप धारण करताना दिसत आहे. हजारो कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत आणि एकच मिशन जुनी पेंशन या नाऱ्यांनी आपल्या मागण्या, भावना सरकारला कडाव्या यासाठी नारे देत आहेत. पण एकीकडे या मागण्या सुरु असतांना याला विरोध होत आहे की यांना लाच पाहिजे पगार पाहिजे आणि पेन्शन ही. तर थोडक्यात सर्व कर्मचारी तसे नसतात १००% पैकी १% जर लाच घेताना दिसले असेल,सापडले असेल तर सर्व कर्मचारी वर्गाला हा दोष देणे योग्य नाही. काही जाणीवपूर्वक पेंशन ला विरोध करत आहेत वयाचे ६० वर्ष होइपर्यंत जनतेची सेवा करणारा कर्मचारी रिटायर्ड झाल्यावर कोणते काम करेल, सर्वांना सांभाळणारे असतात असे नाही त्या वयात कोणतेही काम करणे शक्य होत नाही. म्हणून विरोध करणाऱ्यांनी हे समजून घ्यावं व सरकारी कर्मचारी वर्गाचा लढा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. बी एस एफ ग्रूप चे भूषण सरदार यांनी प्रत्यक्षात भेट देऊन त्यांच्या या लढयाला समर्थन दिले. समृद्धी महामार्गांवर हजारो करोड खर्च केल्यापेक्षा जे महत्वाचे आहे ते जुनी पेंशन योजना सरकारने सुरु करायला हवी. आताही वेळ गेलेली नाही. शासनाने लवकर निर्णय घेऊन जुनी पेंशन सुरु करावी अन्यथा येणाऱ्या काळात सरकारी कर्मचार्यांचे आंदोलन देशव्यापी होईल यात शंका नाही.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com