दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

 

      आळंदी : श्री ज्ञानेश्वर विद्यालयांमध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना एस.एस.सी. बोर्ड परीक्षेला सामोरे जात असताना त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी व त्यांना परीक्षेत चांगले यश मिळून जीवनात यशस्वी व्हावे यासाठी शुभेच्छा समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. विजय ता. बोत्रे, प्रमुख उपस्थिती रामदास धनवटे, योगेश शहा, राजूभाई मदलानी, बबन नवनाथराव सांगळे,विठ्ठल दानवे, रामदास तांबे समवेत संस्थेचे सचिव अजित वडगावकर, सदस्य अनिल वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता गावडे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, सर्व १० वीचे वर्गशिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा भूषण पुरस्काराने गौरविण्यात आल्याने विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. अजित वडगावकर यांनी विविध प्रयत्नातून शाळेचा विकास साधणाऱ्या सर्व घटकांचे अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल सारख्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून जीवन घडविण्यासाठी प्रयत्न करण्याचा संदेश दिला. नंतर रामदास धनवटे यांनी विद्यार्थ्यांमधील कलागुणांना, त्यांच्यातील क्षमतांना ओळखून त्यांना मार्गदर्शन करत घडविण्याचे कार्य करणाऱ्या गुरूंना अभिवादन केले. विद्यार्थ्यांच्या संस्कार गुणांचा आरसा असणाऱ्या शिक्षक व संस्था पदाधिकारी यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात सकारात्मक दृष्टिकोन बाळगून गुरूंच्या आशीर्वादाने व ज्ञानाच्या बळावर एक आदर्श व्यक्ती व्हावे असा उपदेश करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थी तसेच दशेतील आपल्या आठवणींना, भावनांना उजाळा दिला. त्यानंतर बबन सांगळे यांनी इयत्ता दहावी हे विद्यार्थी जीवनातील सर्वात महत्त्वाचे वर्ष असल्याचे सांगत या वर्षातच आपल्याला जीवनात पुढे जाण्यासाठी मार्ग निवडून उद्दिष्ट / ध्येय निश्चित करणे व त्यासाठी प्रयत्न करणे तसेच कठीण परिस्थितीशी जिद्दीने लढले असता यश नक्की मिळते, त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्यातील कौशल्य व आवड ओळखून प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. शेवटी विजय बोत्रे यांनी प्रेम ज्ञान व भक्तीचा संगम म्हणजे श्री ज्ञानेश्वर विद्यालय असे कौतुकास्पद उद्गार काढले. विद्यार्थ्यांनी जीवनात एवढे यश, कर्तृत्व संपादन करावे की आपल्या नावाने शाळेची ओळख व्हावी तसेच आपल्याकडून माती आणि संस्कृतीचा सन्मान व्हावा यासाठी प्रेरित केले. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवनातील प्रत्येक परिस्थितीत व परीक्षास सामोरे जावे, गुरु विषयीची कृतज्ञता जोपासावी. जीवनातील आव्हाने, परिस्थिती, ध्येय व गुरु हेच विद्यार्थ्यांना मोठे करत असतात असा संवाद साधत विविध कथा, खेळ, उदाहरणे इत्यादी माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या निमित्ताने शैक्षणिक वर्ष 2022 – 23 च्या इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांनी आपली आठवण म्हणून विद्यालयास सहा पोडियम (टिचर स्टॅन्ड) भेट दिले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजायिनी राजहंस यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार अनिता गावडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन इयत्ता नववीचे वर्गशिक्षक व विद्यार्थी यांनी केले तर कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण तंत्रस्नेही शिक्षक प्रकाश भागवत यांनी केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com