कूरखेडा व कोरची तालुक्यात आरोग्य,रस्ते,विज व शिक्षणाची दूरावस्था,पत्रकार परिषदेत शिलू चिमूरकर यांचा आरोप…

      राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

       मागील दहा वर्षांत कूरखेडा व कोरची तालूक्यात प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधीचा दूर्लक्षामूळे‌ आरोग्य,रस्ते,विज तसेच शिक्षणाची दूरावस्था झाली आहे असा आरोप आज येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ता डॉ.शिलू चिमूरकर यानी केला.

         कूरखेडा तालूक्यात आज पासून डॉ.चिमूरकर यानी जनसंवाद परिवर्तन यात्रा सूरू केली आहे.या निमीत्य येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ.चिमूरकर बोलत होत्या.

       यावेळी त्यानी दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागात आरोग्याची दूरावस्थाकडे लक्ष वेधले तसेच सतीनदीचा खचलेल्या रपट्यामूळे व पर्यायी मार्गाचा दूरावस्थेमूळे‌ दोन्ही तालूक्यातील नागरीकाना होणारा मानसिक व शारीरिक त्रास,कोरची तालूक्यात विजेचा लपंडावामुळे व कूरखेडा तालूक्यात कृषी पंपावरील भारनियमनामूळे‌ शेतकऱ्यांच्या होणाऱ्या अवदशाकडे लक्ष वेधले.

          कूरखेडा सारख्या शहरात सार्वजनिक पाणी पूरवठा नळ योजनेतून गढूळ पाण्याचा पूरवठा होत आहे.तसेच मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थांकरीता राबविण्यात येणारी बस सेवा नियमीत व वेळेवर पोहचत नसल्याने विद्यार्थांचे शैक्षणिक नूकसान होत आहे असा आरोप सूद्धा यावेळी त्यानी केला व याकरीता प्रशासन आणि स्थानिक निष्क्रिय लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचे सांगीतले.

       याप्रसंगी कांग्रेसचे तालुका उपाध्यक्ष शोएब मस्तान,माजी आरोग्य व पाणी पूरवठा सभापती मनोज सिडाम,संदेश कोटागंले,यूवक कांग्रेसचे पदाधिकारी पिंकू बावने आदि हजर होते.