शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर यांना “पद्मश्री” मिळण्यासाठी पाठपुरावा करु :– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…  – भंडारा डोंगर पायथा येथे आयोजित गाथा पारायण सोहळ्यास उपमुख्यमंत्री शिंदेची भेट…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

पुणे : महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील कोहीनुर तसचे वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा अध्यापक शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा ही जशी वारकरीऱ्यांची इच्छा आहे तशीच ती महाराष्ट्र शासनाची असून महाराष्ट्रातील पुरस्कार समिती याबाबत मान्यता देऊन ते केंद्र सरकारकडे पाठवू व योग्य पाठपुरावा करु असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

         जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी (३७५ वा) सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त भंडारा डोंगर पायथा येथे आयोजित गाथा पारायण सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला.

         यावेळी मारोती महाराज कुऱ्हेकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शरद सोनवणे, सुनील शेळके, विलास लांडे, पुरुषोत्तम महाराज मोरे, अक्षय महाराज भोसले, माऊली महाराज कदम, बाळासाहेब काशीद, शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण उपस्थित होते.

          उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र ही संत, शूर-वीरांची भूमी आहे. भंडारा डोंगरावर प्रत्येक वारकऱ्याची श्रद्धा आहे. त्यामुळे भंडारा डोंगरातून जाणारा बोगदा मार्ग बदलण्यात आला आहे. नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी २२०० कोटीचा डीपीआर तयार करुन केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. परंतु, नद्या पुनरुज्जीवनाची ही चळवळ यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.