काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न दिले नाही :- ऍड.संतोष कोल्हे…

युवराज डोंगरे /खल्लार 

            उपसंपादक

           विश्व रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कांग्रेस पक्षाने भारत रत्न देण्यात टाळाटाळ केली तसेच लोकसभेत निवडून जाण्यासाठी सतत अडथळे आणले हे दलितांनी लक्षात ठेवणे जरुरीचे असल्याचे मत मतदार संघातील,टाकळी,घोडचंदी, रामराव,,डोंगरगाव, इत्यादी गावातील बुद्धीवादी समाज बांधवांच्या सभेत व्यक्त करुन बाबासाहेबाच्या अनुयायांनी कांग्रेस पासुन दुर राहीले पाहिजे असे ऍड संतोष कोल्हे आवाहन केले.

          खुद्द बाबासाहेब आंबेडकर यांनी कांग्रेस हे जळते घर असल्याचे जाहीर पणे सांगितले होते यांची आठवण दलित भावंडांनी कायम लक्षात ठेवावी असे आवाहन करुन कांग्रेस आणी भाजप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तसेच दोघे ही कायम दलित विरोधी आहेत..बाबासाहेबांनी जो आयुष्य भर दलितांसाठी संघर्ष केला तो काय आपण काँग्रेसच्या झोळीत मतदान टाकण्या साठी केला काय असाही सवाल ऍड संतोष कोल्हे यांनी उपस्थित केला.

            ऍड संतोष कोल्हे यांचे अभ्यास पूर्ण सडेतोड विचार ऐकुन दलित बांधवांची बौद्धिक विचार सरणी दिवसेंदिवस कांग्रेस विरोधात जात असल्याचे मतदार संघात चित्र उमटत असुन नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भारतीय संविधान धोक्यात असल्याचे खोटे सांगून दलितांच्या मतांवर डाका टाकला. हे दलितांच्या लक्षात आले असुन आता तसे मात्र होणार नसल्याचे ही दलित व मागासवर्गीय मतदारांमध्ये विचार प्रवाह जोर धरुन आहे. तसेच कांग्रेस ने आमची मते विजयासाठी ह्या पुढे धरु नये असेही डा.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आता उघडपणे बोलत आहेत.

           ऍड .संतोष कोल्हे यांच्या वैचारिक प्रबोधन सभेच्या डोंगर गाव येथील आयोजनासाठी डोंगरगाव बुद्ध विहार येथील नागरिक विठ्ठलराव उमाळे, देवानंद उमाळे, गजानन उमाळे,भिमरावजी उमाळे, लक्ष्मणराव उमाळे, रमेशराव उमाळे, प्रकाश उमाळे, अनिल उमाळे, किशोर उमाळे ,तसेच उप् भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष मुरलीधरजी रायबोरडे,सुधिर बसवंत, सुरेंद्र तायडे, भारत वैद्य, इत्यादी केले.