पुणे जिल्हा प्रतिनिधी

खानापूर ते रांजणे फाट्याला जोडणारा दुवा म्हणजे असणारा पुल परंतु ह्या मुख्य रस्त्याचे मागील दोन वर्षापासून काम सुरू आहे. पर्यायी रस्ता म्हणून बाजूने कच्च्या रस्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु हा कच्चा रस्ता आता पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. या रस्त्यावरून वेल्हे तालुक्यात तसेच पानशेत परिसरात सतत वाहतूक सुरू असते. लोकप्रतिनिधी विकासकामे करतात परंतु ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरूनच का कामे करतात, असा प्रश्न ग्रामीण जनतेला पडला आहे. विकासकामे करत असताना पावसाळ्याच्या दृष्टीने महत्त्वाची कामे पूर्ण का होत नाही. अनेक गावातील लोक ये जा करत असतात या रस्त्याने मग हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण का केले गेले नाही.

राजकारणाची पातळी घसरली आहे म्हणून तुम्ही जनतेच्या जीवाशी खेळ करू शकत नाही. ह्या पुलावरून पाणी वाहत असल्याने लोकांना जीव धोक्यात घालून वाहतूक करावी लागत आहे. आता या परिसरातील नागरिक आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, काम जरूर सुरू आहे परंतु वर्षे इतकी का लागली, लोकप्रतिनिधींना आमच्या जीवाशी खेळायच आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com