ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अस्तित्वाचा गौरव :- समतादुत प्रज्ञा राजुरवाडे.. 

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

       विविध क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या समस्त स्त्रीयांच्या कर्तुत्वाचा पाया,स्त्री शिक्षणाच्या कार्यातून ज्योतीबाफुले व सावित्रीबाई फुलेंनी रचला.

     त्यांची काळाच्या पुढे बघन्याची दृष्टी अनेक पिढ्यांना दिशा देणारी आहे.प्रचंड प्रवाहाच्या विरोधात जाऊन उदात,निस्वार्थी,योग्य समाजसुधारणा वादी भूमीकेवर कार्य करून भारतिय स्त्रीयांचे मुक्तीचे पाऊल,स्त्री अस्तित्वाचा गौरव म्हनजे सवित्रीबाई फुले होय,असे प्रतीपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणेच्या समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी गदगाव येथे सवित्रीबाई फुलेंच्या जयंती दिनानिमित्त मार्गदर्शन करताना केले.

              कार्यक्रमाचे अध्यक्ष रंजित शंभरकर होते तर प्रमुख अतिथी भंदत डॉ.धम्मचेती,डॉ.सतीष वारजुरकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर,कांग्रेश कमिटीचे डॉ.मदन रामटेके,शैलेंद्र बारसागडे ऐनसिआर रिपोर्टर महारास्ट्र राज्य,जगदीश मेश्राम भिम आर्मी तालुका अध्यक्ष,सरपंच लोकनाथ रामटेके, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या सहसचिव कल्पना महाकाळकर,श्री.छ्त्रपाल लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

               पुढे बोलताना समतादुत प्रज्ञा राजूरवाडे म्हणाल्या की सवित्रीबाई फुले शिक्षणाच्या दीपस्तंभ होत्या,त्यांचे जिवन आम्हाला शिकवते की शिक्षण हे सर्वात मोठे स्त्रीच्या सक्षमीकरणाचे माध्यम आहे.आपल्या मुलामूलिंना उच्च शिक्षण द्या,घरात समानतेने वागवा,मुलीमधिल सुप्तगूनांना ओळखुन तिला व्यक्त होन्यासाठी प्रेरित करा,मुलींना उच्च शिक्षण देवून ऐका पिढीला सक्षम करा,ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच्या शिक्षण प्रेमामुळेच आज अनेक स्त्रीयांच्या जिवनाला स्वतंत्र्य अस्तीत्व मिळाले,त्यांच्या कार्याचा आदर्श घेत समाजात शिक्षण,समता,स्त्री अधीकार, वंचित घटकाच्या न्यायासाठी योगदान देणे गरजेचे आहे,सवित्रीबाई फुलेंच्या विचारांतून समाजात सकारात्मक बदल घडविणे आपली जबाबदारी आहे,त्यांच्या विचारांना कृतीत उतरवून घराघरात सवित्री निर्माण करावे असे सविस्तर मार्गदर्शन समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले.

       या कार्यक्रमाचे आभार तेजस शंभरकर यांनी मानले.