दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
मुंबई : महाराष्ट्रातील वारकरी परंपरचे श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाच्या उत्सवाचे बोधचिन्हाचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे अनावरीत झाले.
यावेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, उमेश महाराज बागडे उपस्थित होते.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज हे वारकरी संप्रदायाचे रचीयाता आहेत यंदाचे सुरू असणारे वर्ष २०२४ – २५ हे त्यांच्या जन्माचे ७५० वर्ष म्हणुन साजरे होत आहे. प्रधान सचिव प्रवीण दराडे यांचे संस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले.
महामहीम श्री राज्यपाल महोदय यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनास येण्याची इच्छा व्यक्त केली व लवकरच संजीवन समाधी दर्शनास येण्याचे सांगितले. प्रमुख विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप व पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी संस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती राज्यपाल यांना दिली.