युवराज डोंगरे/खल्लार

 

    दर्यापूर तालुक्यातील उपराई ते महिमापुर रस्त्यावर असणाऱ्या नाल्यावर याच वर्षात पुल बांधण्यात आला होता.सझर पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने एका पावसातच पुलाच्या बांधकामाची दैन्यावस्था झाली असल्याचा आरोप युवासेना विधानसभा समन्वयक प्रतीक पाटील राऊत यांनी केला आहे.

     या रोडवर नुकतेच पुलाचे काम झाले होते,सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असतानाही एकाच पावसात हा पुल जड वाहनांसाठी निकृष्ट ठरतोय,अमरावती ते महीमापुर बस सेवा सुरु असताना या नविन झालेल्या पुलावरून बस ड्रायव्हर बस नेत नाही,त्यामुळे उपराई मधुनच बस परत जाते.

       यामुळे महीमापुर,दीघी,वडुरा येथील शाळकरी विद्यार्थी आणि प्रवासी यांचे प्रचंड हाल होत आहे.त्यामुळे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित पाहणी करून त्या पुलावरून पाऊस आला तरीही जड वाहने गेली पाहिजे अशी व्यवस्था करावी अशी मागणी युवा सेना विधानसभा समनव्यक प्रतीक पाटील राऊत यांनी केली आहे.अन्यथा युवा सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com