11 डिसेंबर काँग्रेसचा विधानभवनावर हल्ला बोल मोर्चा… — काँग्रेस पदाधिकाऱ्यासह हजारोच्या संख्येने युवक, महिला, शेतकरीही होणार सहभागी…

       राजेंद्र रामटेके 

ग्रामीण तालुका प्रतिनिधी कुरखेडा

      गडचिरोली :: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील शेतकरी, महिला, युवक, यांच्या समस्या, वाढती महागाई, बेरोजगारी अश्या विविध समस्याना घेऊन 11 डिसेंबर रोजी, नागपूर विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे.

          या मोर्चात गडचिरोली जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक आणि शेतकरी सुद्धा जिल्ह्यातील विविध मागण्याना घेऊन सहभागी होणार असून त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची नियोजन बैठक आज पत्रकार भवनाच्या सभागृहात पार पडली.

            या बैठकीला अध्यक्ष म्हूणन जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी खासदार मारोतरावजी कोवासे, मोर्चाचे   विधानसभा निहाय निरीक्षक म्हणून गडचिरोली विनायक बांगडे, आरमोरी चंद्रशेखर ठवरे, अहेरी विजय नळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, महिला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, काँग्रेसचे जेष्ठ नेते ऍड. रामभाऊ मेश्राम, महिला जिल्हाध्यक्ष ऍड. कविताताई मोहरकर, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते,  जि. प. माजी उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वडसा राजेंद्र बुल्ले, चामोर्शी प्रमोद भगत, गडचिरोली वसंत राऊत, सहकार सेल अध्यक्ष अब्दुलभाई पंजवाणी, किसान सेल अध्यक्ष,  वामनराव सावसाकडे, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, काँग्रेस नेते प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, देवाजी सोनटक्के, कविता भगत, वैशाली ताटपल्लीवार, गुलाब मडावी, हरबाजी मोरे, प्रशांत कोराम, अनिल कोठारे, श्रीकांत कथोटे, रामभाऊ नन्नावरे, भैय्याजी मुद्दमवार, नरेंद्र गजपुरे, कृष्ण झंजाळ, नृपेश नांदनकर, सुभाष धाईट, बंदोपन्त चिटमलवार, रमेश धकाते, दुशांत वाटगुरे, रवी मेश्राम, दिलीप फुलबंधे, लक्ष्मण कोवे, गणेश कोवे, प्रफुल आंबोरकर, लालाजी सातपुते, संदीप भोयर, अतुल गेडाम, शैलेश मानकर, घनश्याम रायपुरे, मिलिंद बारसागडे, सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

हल्ला बोल मोर्चा, जिल्ह्यातील या असतील प्रमुख मागण्या…

१) मेडिगट्टा धरणामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर होत असलेले अन्याय दूर करण्यात यावे.

2) जिल्ह्यातील नरभक्षक वाघांचा व रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा.

३) या वर्षीच्या खरीप हंगामाकरीता सरसकट दुष्काळ जाहिर करुन एकरी ५० हजार रुपये मदत द्या.

४) कोनसरी प्रकल्प सुरु झाल्याशिवाय जिल्ह्यातील सुरजागडचा कच्चा माल परराज्यात किंवा जिल्ह्याबाहेर नेऊ नये.

५) कोनसरी परिसरातील जमिनींचे सरसकट अधिग्रहण रद्द करा.

६) कोनसरी प्रकल्प तात्काळ सुरू करून जिल्ह्यातील स्थानिक युवकांना रोजगार देण्यात यावे.

७) सुरजागडच्या वाहतूकीमुळे झालेल्या अपघातांची चौकशी करुन लॉयड मेटल कंपनीवर गुन्हे दाखल करा.

८) जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे तातडीने दुरुस्ती करण्यात यावी व प्रलंबित विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्यात यावे.

९) उत्खननामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानीची NGT आणि प्रदुषण महामंडळाकडून चौकशी करण्यात यावी.

१०) विनाअट सर्व पिकांकरीता सर्व शेतकऱ्यांना पिकविमा मंजूर करा.

११) अवकाळी पाऊस व गारपिट ग्रस्त सर्व शेतकऱ्यांना प्रती एकरी ५० हजार रुपये मदत द्या.

१२) फडणवीस सरकारच्या काळातील फसव्या कर्जमाफी योजनेतून सुटलेल्या पात्र शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमूक्त करा.

१३) नियमित कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी तात्काळ द्या.

१४) पिक कर्जासाठी लागू करण्यात आलेली सिबीलची अट तात्काळ रद्द करा.

१५) पिकांची नासाडी करणाऱ्या जंगली जनावरांचा बंदोबस्त करा अथवा नुकसान भरपाईसाठी पिकविमा लागू करा.

१६) सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची जूनी पेंशन योजना विना अट लागू करा.

१७) नविन आकृतीबंद नुसार मंजूर असलेल्या सर्व विभागातील रिक्त पदांची भरती करा.

१८) रोजगार मिळेपर्यंत राज्यातील सर्व बेरोजगारांना दरमहा ५ हजार रु. भत्ता लागू करावा.

१९) सरकारच्या विविध विभागात कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी व अधिकारी यांचे शासकीय सेवेत समायोजन करा.

२०) राज्यातील अंगणवाडी सेविका / मदतनीस, आशा वर्कर व ग्रामरोजगार सेवक यांच्या प्रलंबित मागण्या त्वरीत मंजूर करा.

२१) सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती त्वरीत अदा करा.

२२) राज्यातील बेघर नागरिकांना सरसकट घरकूल योजनेचा लाभ द्या.

२३) राज्यातील वाढती महागाई तसेच गॅस, पेट्रोल व डिझेलचे वाढलेले दर कमी करा.

२४) सर्वसामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्याकरीता जात निहाय जनगणना करा.