
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
आपल्या भारताचा पुरातन इतिहास बघितला तर भगवान विश्वकर्मा देवांचे वास्तुकला तज्ञ आहेत.त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका,पांडवासाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली.
या नगरांच्या रचनेत,सौंदर्य,अचुकता व सुखसोयी यांचा मिलाप होता.ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत.त्यांच्या वास्तुशास्त्राचे भारतात मोठे महत्व असून त्यांच्यापासूनच खरे घर बांधकाम करतांना व कुठलेही बांधकाम करतांना वास्तुशास्त्राचा वापर केला जातो.
प्रभू विश्वकर्मा यांच्या जयंती निमित्य भारतात सर्वत्र उत्सव साजरा केला जातो,असाच एक मोठा उत्सव भद्रावती येथे दिनांक 10 फेब्रुवारी रोज सोमवारला साजरा करण्यात येणार असून मंगेश बुरडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या महोत्सवात समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समाज संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.