डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
गडचिरोली:-
पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
माहितीनुसार,साईनाथ नरोटे (२६) असे तरुणाचे नाव असून तो भामरागड तालुक्यातील मर्दहुर गावाचा रहिवासी होता.साईनाथ हा गडचिरोली येथे शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता.होळीच्या सणानिमित्याने आपल्या स्वः गावी आला होता.
मात्र,साईनाथ हा पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी त्याची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
त्याच्या हत्या घटनाक्रमामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे..