डॉ.बाबासाहेब आंबेडकराना जागतीक पातळीवर समताधिष्ठित समाज निर्मिती अपेक्षीत-समतादुत प्रज्ञा राजूरवाडे…

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

       डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बूद्धमिशन म्हणजे संपुर्ण मानवजातीच्या कल्यानासाठी आहे.बुद्धनिष्ठ,विवेकनिष्ठ,व तर्कशुध्द जिवन जगने हाच बौद्ध धम्माचा खरा गाभा आहे.

             मानवी जिवन दुखाने भरलेले आहे.दु:ख निवारन्याचा मार्ग बौद्ध धम्माचे अंतीम ध्येय आहे.भौतिक सुखाच्या मागे धावन्याची फार स्पर्धा जगात सूरु आहे,बौद्ध विचार आंनदी,मानसीक सुख शांतिमय जिवन जगन्याचा मार्ग आहे असे प्रखळ मत समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

      वैक्ष्विक करुणा,मगंलमैत्री,चारित्र्य संपन्नता, नैतीकता,प्रज्ञा,शिल आचरनात आणून संस्कारक्षम प्रबूद्ध भारत देश घडवुन जगाला प्रेरणादायी असे जागतीक पातळीवरिल समताधिष्ठित समाज निर्मिती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असल्याचे प्रतीपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टि पुणेच्या समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी सूभेदार रामजीबाबा आंबेडकर स्मुर्तीदिन व बौद्धध्मम परिषद कार्यक्रम बौद्ध मुर्ती प्रतिस्ठापना व बौद्ध समारंभ मिलिंद बौद्धविहार नागसेन वन धम्मभुमी स्मारक मंडळ शिवनपायली येथे डॉ.बाबासाहेबाना अपेक्षीत समाजनिर्मिती या विषयाला अनुसरून मत व्यक्त केले.

               कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डाॅ.दिलीप पाटील मुंबई,उद्घाटक लोकेश गजभिये नागपुर,प्रमुख मार्गदर्शक समतादुत प्रज्ञा राजूरवाडे बार्टि पुणे,विनोद खोब्रागडे,बौद्ध धम्म समारंभाचे अध्यक्ष पुज्य भदंत शिलानदजी महास्थविर भिखूसंघ तपोभुमी वर्धा,उदघाटक पुज्य भदंत ज्ञानज्योती महास्थविर भिख्खू संघनायक ताडोबा अभयारन्य संघरामगीरी,पुज्य भंते डॉ.धम्मचेती,भंते धम्मवंश,श्रामनेर इंदूमती बौद्धगया,समतासैनिक दल दिक्षाभुमी नागपुर गोडानेताई,वासनिक ताई,विजय डाबरे,एकनाथ गोंगले,पोलिस उपनिरिक्षक तालीकाटे,सरपंच राजू भानारकर,पोलिस पटिल महेंद्र डेकाटे,समाजसेवक किशोर अंबादे,आदी मान्यवर उपस्थीथ होते.

       पुढे बोलताना समतादुत प्रज्ञा राजूरवाडे म्हणाल्या की जगात सर्वप्रथम राज्यपद्धत व विद्यापीठ संकल्पना ही बौद्ध काळात रुजली.बौद्ध धम्मात मानवाला पुर्नत्वाकडे नेन्याचे सामर्थ्य आहे,म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ध्येय साकार करन्यासाठी बौद्ध धम्मपरिषद घेणे त्यातुन बौद्धध्ममाचा प्रचार व प्रसार करणे ही काळाची जबाबदारी आहे असे सविस्तर मार्गदर्शन यावेळी समतादुत प्रज्ञा राजूरवाडे यांनी केले.

      यावेळी कव्वाल विकासराजा यांच्या द्वारे भिमगितांचा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनार्धन डेकाटे यानी केले तर आभार दीपचंद खोब्रागडे यांनी मानले.