ऋषी सहारे

संपादक

 

सकाळी ७ वा. च्या सुमारास अहेरी आगारातून एटापल्ली मार्गे गडचिरोलीकडे निघालेल्या बस ला ट्रक ने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली तरी एसटी महामंडळाच्या बसचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर सुरजागड लोह प्रकल्पाविषयी लोकांमध्ये रोष निर्माण झाल्या असून लवकरात लवकर वाहतूक न थांबविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही यावेळी दिला आहे.

 

अहेरी-एटापल्ली-जारावंडी मार्गे गडचिरोली कडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या (एम एच-४० ए क्यू – ६०९४) या बस ला आलापल्ली च्या एटापल्ली रस्त्यावर सुरजागड चा लोहखनिज घेऊन आष्टीकडे जाणाऱ्या (ओ डी-०९ जी-०८५५) या ट्रकने धडक दिली.बस ला धडक देताच बस मधील प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत बाहेर पडले.

 

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.माहिती मिळताच अहेरीचे उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बोण्डसे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.सध्या एटापल्ली-आलापल्ली-आष्टी या मुख्य मार्गावर अपघात,वाहतूक कोंडी होणे हे नित्याचेच झाले आहे.त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.

प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढण्यासाठी आलापल्ली येथील व्यापारी संघटनेने या अगोदरच प्रशासनाला निवेदन दिले आहे.योग्य नियोजन आणि नियंत्रण नसल्याने दिवसेंदिवस अश्या घटना घडत असल्याची ओरड सुरू आहे.प्रशासन पुढे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com