उपसंपादक/अशोक खंडारे
नगरसेवक आशिष पिपरे यांच्या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावठाण व आखिवपत्रिकेची अट रद्द केली आता फक्त 3 वर्षाच्या घरटॅक्स पावतीच्या आधारावर मिळणार घरकुल आहेत चामोर्शी शहरात बहुतेक पात्र गरीब लाभार्थी हे शासकीय जागेवर गेल्या 20 ते 25 वर्षानुसार राहत होते तसेच अनेक गरीब पात्र लाभार्थी पिढ्यानपिढ्या कृषक (7/12 असलेल्या) जागेवर घर बांधून राहत आहेत व त्यांना घरकुलाची जास्त आवश्यकता असतांना आखिव पत्रिकेमुळे व गावठाणच्या अटीमुळे बरेच लाभार्थीना लाभापासून वंचित रहावे लागत होते ही नागरीकांची अडचण लक्षात घेऊन नगरसेवक आशिष पिपरे यांनी जिल्हाधिकारी,खासदार व उपमुख्यमंत्री यांना वारंवार निवेदनातून मागणी केली होती व शेवटी खासदार अशोक नेते यांनी सदर प्रश्न लोकसभेत लावून धरला व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार निवेदन देवून मागणीचा सतत पाठपुरावा केला व आज विधी मंडळात चर्चा होऊ या मागणीला यश येवुन सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या, नागरिकांच्या घरकुलाचा मार्ग मोकळा झाला त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांचे मनापासून आभार व नगरसेवक आशिष पिपरे यांचे अभिनंदन गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकारी व गोरगरीब जनता करीत आहेत.