अप्पर जिल्हाधिकारी चिमूर करीता सिंदेवाहीकरांचा विरोध.. — अप्पर जिल्हाधिकारी कार्यालया करीता मध्यवर्ती स्थळाची निवड कां नाही?.. — सिंदेवाहीकरांचा संतप्त सवाल?

जिल्हा प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी

दखल न्यूज भारत

       चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होणे ही अत्यंन्त महत्वाची बाब आहे.कारण ज्यावेळेस चंद्रपूरचे विभाजन होऊन गडचीरोली जिल्हा निर्माण झाला त्यावेळेस सुद्धा सिंदेवाही बाबत सकारात्मक अहवाल पाठवीण्यात आला होता. 

         परंतू वैनगंगेला हद्द ठरवून विभाजण केल्यामुळे सिंदेवाही हा तालुकाच राहीला.जिल्ह्याचे विभाजन करतांना नवनिर्मीत जिल्ह्याचे ठीकाण हे जवळपास समावीष्ट क्षेत्राचे मध्य ठिकाण असावे.दळण-वळणाची साधने रेल्वे,प्रमुखमार्ग असावेत.पूरेशी जागा असावी,विभाजन संयुक्तीक असावे व जिल्हानिर्मीती प्रक्रीया ही कायमस्वरुपी असल्यामुळे प्रशासकीय,भौगोलीक,आर्थीक व वेळेच्या बचतीच्या द्रूष्टीने सर्वसामान्य नागरीक शासन व प्रशासनाला परवडणारी असावी.

        ह्या दृष्टीकोनातून विभाजन होणे महत्वाचे आहे. जिल्हाधिकारी यांचे पत्र क्र.222/20 दिं. 29/1/2021 नुसार मागणी केलेल्या आक्षेपास अनुसरुण सिन्देवाही तालुक्यातील हजारो नागरीकांनी सामुहीक / वैयक्तीक स्वरुपात आक्षेप उपविभागीय अधीकारी कार्यालय चिमुर येथे माहे फरवरी 2021 मद्धे नोंदवीले आहे.त्या आक्षेपा नुसार आजपर्यन्त कोणताही निपटारा/सुणावणी न करताच दिं. 13/6/2023 रोजी मंत्रीमंडळात घेतलेला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यान्वीत करण्याचा निर्णय हा जनहीत विरोधी असून भावनीक व राजकिय दृष्ट्या प्रेरीत आहे.

         कारण चंद्रपूर जिल्हा हा 15 तालुके मीळून बनलेला आहे. तेव्हा विभाजन म्हटले तर 8-7, 9-6 ह्या प्रमाणात होणे न्यायोचीत आहे. परंतु तसे न करता ते 11-4 ह्या प्रमाणात करुण चुक केलेली आहे.

        लोकसंखेच्या बाबतीत सुद्धा 2011 च्या जनगनणने नुसार चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या 22,04,304 आहे ठोकळ माणाने विभाजन केल्यास अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजन निकषानुसार मूळ जिल्हा सरस समजून 12,04,304 व नवीन जिल्ह्याची 10,00,000 लोकसंख्या असावयास पाहीजे.

           परंतू तसे न करता चंद्रपूरचे बाबतीत मुळ जिल्हा 16,25,135 व अप्पर जिल्हा 5,79,169 लोकसंख्या असे विभाजन करुन फार मोठा घोळ केलेला आहे.सिन्देवाही करांची मागणी ही सुद्धा फार जुणीच असून ह्यापूर्वी नकाशा,अंतर व सुविधेबाबत सविस्तर शासण, प्रशासणास कळवीले आहे,तेव्हा निवेदनासोबत जोडलेल्या नकाशा चा जिल्हा / अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मीतीच्या संबंधाणे सकारात्मक विचार करावा अन्यत: नाईलाजास्तव संविधानीक मार्गाने लढा लढावा लागेल असा ईशारा सिन्देवाही जिल्हा निर्मीती कृती समितीच्या वतीने देण्यात आला.

      यावेळेस प्रामुख्याने सर्वश्री मनोहर पवार,जयदेव श्रीरामे,रामटेके सर,भालतडक सर,विद्या धुळेवार,वंदना गजभीये,मेंढूळकर मँडम,हिरालाल ईंदोरकर,पंकज कंकलवार,परसराम सलामे,विलास गंडाटे,लोणबले,कोकोडे, व ईतर बहुसंख्य नागरीक उपस्थीत होते.