भक्तीमय वातावरणात श्रीगुरु हैबतबाबा पायरी पुजनाने कार्तिकी यात्रेला सुरुवात…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्यात वारकरी परंपरा जोपासत टाळ, विना, मृदंगांच्या साथीत अखंड हरिनाम गजर करीत श्रीगुरू हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने ७२७ व्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यास मंगळवारी सकाळी नऊ वाजता हरी नाम गजरात सुरुवात झाली. कार्तिकी यात्रेनिमित्ताने माऊली मंदिरात पहाटे घंटानाद झाला. त्यानंतर माऊलींच्या संजीवनी समाधीवर पावमान अभिषेक झाला.

             सकाळी नऊ च्या दरम्यान पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर आणि कुटुंबाच्यावतीने आकर्षक फुलांनी सजवलेल्या श्रीगुरू हैबतबाबा यांचे पायरीचे वारकरी परंपरेने विधिवत पूजा करण्यात आली. श्रीगुरू हैबतबाबा पायरी पूजे दरम्यान पादुकांची विधीवित पूजा करताना वेद मंत्राच्या जयघोषता दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तर, पुष्पहार, फुले अर्पण करून प्रसाद महानैवेद्य दाखवण्यात आला. यावेळी पूजेचे पौरोहित्य वेदमुर्ती श्रीनिवास कुलकर्णी यांनी केले.

              यावेळी विश्वस्त ॲड.विकास ढगे पाटील, योगी निरंजननाथजी, हभप भावार्थ देखणे, ॲड.राजेंद्र उमाप, हभप केशव महाराज नामदास, राजाभाऊ चोपदार, योगिराज कुर्‍हाडे, योगेश आरू, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक उपायुक्त राजेंद्रसिंग गौर, आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, डी.डी.भोसले, राहुल चव्हाण, अजित वडगावकर, ॲड.विष्णू तापकीर, नंदकुमार वडगावकर, ज्ञानेश्वर दिघे उपस्थित होते.

                श्रीगुरू हैबतबाबा यांच्या ओवरीत पूजा, आरती झाली. ओवरीत विश्वस्त मंडळांच्या उपस्थितीत प्रथपरंपरांचे पालन करीत पूजा विधी झाला. पालखी सोहळामालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हस्ते विश्वस्त व मानकऱ्यांचा नारळ प्रसाद देवून सन्मान करण्यात आला. यावेळी वेळी मंदिर आणि परीसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.