धानोरा/भाविक करमनकर
जय पेरसापेन हायस्कूल, माळंदा येथील विद्यार्थ्यांनी सामळा नदीवर “पाणि अडवा पाणि जिरवा ” या उपक्रमांतर्गत बंधारा बांधण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ए.एन.बढई,एल.डब्ल्यू.धूडसे,कु.ए.बी.शेख,सि.डी.गद्देवार,एस.पि.मारकवार,जि.एन.ठमके,ए.एस.संतोषवार उपस्थित होते.
“पाणि अडवा पाणि जिरवा ” या उपक्रमांतर्गत बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांना’ ‘जलसंवर्धनाचे ‘ महत्त्व पटवून देण्यात आले.उपक्रमाची सांगता स्नेहभोजनाने करण्यात आले.यावेळी संपूर्ण विद्यार्थ्यांनी मनसोक्तपणे पाण्याचा आनंद लूटला.