अहेरी येथे आमरण उपोषणाला प्रारंभ.. — अवैध वाळू उत्खनन प्रकरणाकडे महामहीम राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,वनमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा परिणाम…

 

डॉ.जगदिश वेन्नम

     संपादक 

      भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम अशा येचली येथील इंद्रावती नदी रेतीघाटातून एकाही रेतीची उचल न करता टिपी (वाहतूक परवाना) येचली येथील दाखवून भामरागड अहेरी तालुक्यातील बांधकामात रेतीचा वापर केल्याने सदर प्रकरणांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करुन संबंधित विभागातील अधिकारी व कंत्राटदार दोषींवर तत्काळ फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्याच्या मागणी संबंधाने संतोष ताटीकोडावार यांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.

        श्री.संतोष रामचंद्र ताटीकोडावार,मु.पो. कमलापूर तह.अहेरी येथील रहिवासी असून ते भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्र राज्यातंर्गत जिल्हा गडचिरोलीचा जिल्हाध्यक्ष आहेत.

        तसेच संतोष ताटीकोडावार हे गडचिरोली जिल्हातील जागृत नागरिक असून त्यांच्या संस्थेमार्फत,शासकीय कर्मचाऱ्यांद्वारा होणाऱ्या भ्रष्टाचाराची काही वर्षापासून वाचा फोडीत आहेत व काही प्रकरणा अन्वये मा.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका देखील दाखल केलेल्या आहेत.

       भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम अशा येचली येथील इंद्रावती नदी रेतीघाटातून एकाही रेतीची उचल न करता टिपी (वाहतूक परवाना) येचली येथील दाखवून भामरागड अहेरी तालुक्यातील नवनिर्माणाधिन बांधकामात रेतीचा वापर केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते.

       यात बनावट दस्ताऐवजाचा आधार घेत शासनाची दिशाभूल करीत कोट्यवधीच्या महसूलला चुना लावण्यात आला होता. या प्रकरणी भामरागड तहसिलदारांनी काही रेतीचा अवैधसाठा केल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई केली होती.

           मात्र या प्रकरणी महसूल विभागाच्या कोणत्याही अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई न झाल्याने सदर प्रकरण थंडबस्त्यात तर टाकण्यात आले नाही ना..? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सन 2021-22 या आर्थिक वर्षात येचली येथील इंद्रावती नदी रेती घाटाचा लिलाव करण्यात आला होता. नियमानुसार 2120 ब्रास रेती उपसा करण्याचे आदेश होते. मात्र संबंधित कंत्राटदानाने नदीपात्रातून रेतीचा उपसा न करता भामरागड अहेरी तालुक्यातील नवनिर्माणाधिन कामासाठी चोरट्या मार्गाने रेतीचा वापर करुन येचली येथील रेती असल्याचा दिखावा करण्यात आला.

        संबंधित विभागाच्या बनावट दस्ताऐवजाचा आधार घेत सदर प्रकार करण्यात आला होता. या प्रकरणी 2120 पैकी भामरागड तहसिलदारांनी केवळ 563 ब्रास रेतीचा अवैध साठा ठेवल्या प्रकरणी 1 कोटीवर दंडात्मक कारवाई केली होती. त्यामुळे आमरण उपोषणकर्ता संतोष ताटीकोडावार यांनी उपविभागीय पोलिस अधिका-यांकडे तक्रार केली होती व सदर प्रकाराची सखोल चौकशी करुन शासनाला कोट्यवधीचा चुना लावणा-या संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचा-यांवर व कंत्राटदारांवर कारवाईची मागणी केली होती.

        सदर भ्रष्टाचार प्रकरणाची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्यासाठी दि. 07/11/2022 रोजी तहसिलदार भामरागड यांना निवेदन दिले होते. दि. 29/11/2022 रोजी जिल्हा खनिकर्म अधिकारी गडचिरोली,जिल्हाधिकारी गडचिरोली यांना लेखी तक्रार दिली होती.

         दि. 01/12/2022 रोजी उपविभागीय दंडाधिकारी अहेरी व एटापल्ली आणि 

04/12/2022 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी जिमलगट्टा,दि. 16/01/2023 रोजी विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांना व्यतिशः तक्रार वजा निवेदन देवून सुध्दा कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही असे आमरण उपोषणकर्ता संतोष ताटीकोडावार यांचे म्हणणे आहे. 

      सदर प्रकरणाची माहिती महाराष्ट्र राज्यातंर्गत महामहीम राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री साहेब,ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार (वन व सांस्कृतीक कार्य मंत्री म.रा.),आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना प्रकरणाची गंभीरता लक्षात आणण्यासाठी माहितीस्तव निवेदन दिले.परंतु त्यांनी सुध्दा अवैध रेती उत्खनन संबधाने कारवाई करण्यास कर्तव्य पार पाडले नाही.

     मात्र त्यानंतर याबाबत कुठलीही कार्यवाही न झाल्याने सदर प्रकरण थंडबस्त्यात टाकून संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना अभय दिल्या जात असल्याने मला नाईलाजास्तव दि. 02/06/2023 रोजी सदर प्रकरणांची वरिष्ठ स्तरावरुन चौकशी करुन संबंधित विभागातील अधिकारी व कंत्राटदार दोषींवर तत्काळ दंडात्मक फौजदारी व निलंबित कारवाई करण्यात यावे अन्यथा नाईलाजास्तव जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली समोर तीव्र आमरण उपोषणास बसण्याच्या संवेदनशील सविनय अशा लेखी सुचना दिल्या होत्या. 

          अवैध रेती उत्खनन प्रकरणाची गंभिरता लक्षात आणण्यासाठी संतोष ताटीकोडावार नाईलाजास्तव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय अहेरी समोर आमरण उपोषणास बसले आहेत.