पंकज चहांदे
दखल न्यूज भारत
देसाईगंज आदिवासी मुळता निसर्ग पुजक असुन त्यांच्या चालीरीती, परंपरा वेगळ्या असुन जल, जंगल जमिनीचे मालक आहेत. मात्र खऱ्या आदिवासींना डावलून बोगस आदिवासींनी त्यांना शासकीय स्तरावरुन मिळणाऱ्या सोयी सवलती बळकावल्यामुळे खऱ्या आदिवासींचा आवश्यक त्या प्रमाणात अद्यापही विकास झाला नसल्याने आदिवासीच्या शेवटच्या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.विजयकुमार गावीत यांनी आदिवासी विद्यार्थी संघाच्या शिष्टमंडळास दिले.
नागपुर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असताना गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी संघाच्या शिष्टमंडळाने ना.गावीत यांची भेट घेऊन त्यांना आदिवासींच्या समस्या अवगत करुन दिल्या असता त्यांनी शिष्टमंडळास उपरोक्त आश्वासन दिले.यावेळी शिष्टमंडळात आविसचे सरसेनापती नंदु नरोटे, प्रभाकर नरोटे, मोहन पुराम, श्रीराम हिडामी, देसाईगंज युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकु बावणे, सदाराम काटेंगे, भानु कुंमरे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
दरम्यान ना. गावीत यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करताना सांगितले की पुर्व विदर्भातील आदिवासींच्या समस्यांची जाणिव असुन शिक्षण, आरोग्य, विज, रस्ते, पाणी, बेरोजगारी व बोगस आदिवासींचा शिरकाव या समस्या प्राधान्याने सोडविण्यास प्राथमिकता देणार असुन ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक निधीची तरतुद करण्यात येईल,मोबाईलची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी प्रयत्न करून आदिवासींच्या सर्वांगीण विकासा संदर्भात आवश्यक ते निर्णय घेण्यात येतील,असे आविसचे सरसेनापती नंदु नरोटे यांच्या नेतृत्वात ना.गावीत यांची भेट घेऊन त्यांना दिलेल्या निवेदनाला उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी त्यांनी आश्रम शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यावर सुद्धा चर्चा करण्यात आली.सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करुन आदिवासींची १२ हजार ५०० पदे त्वरित भरण्यात यावीत, अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे तत्काळ देण्यात यावेत अशीही मागणी ना.गावीत यांच्याकडे केली असता त्यांनी शिष्टमंडळास सकारात्मक उत्तर देत आपण आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.